खास तुझ्यासाठी लिहावं असं कधी वाटलं नाही
प्रेमाने तू जवळ करावं असं कधी वाटलं नाही
मनातील भाव क्षणभर थबकले
हृदयातील शब्द कागदावर ओघळले
तुझ्या प्रीतीचे कवडसे मनावर उमटले
तरी तुला भान हरपून पहावंसं वाटलं नाही
काजळ रात्रीत ही प्रेम तुझे उजळले
माझ्या अंतरीच्या काठास स्पर्शून गेले
तुझे प्रेम माझ्या ओंजळीत भरलेले
तरी तुला ते हृदयात ओतावंसं वाटलं नाही
तरी याचा खेद नाही, खंत वाटली नाही
मी तुझ्यासाठी तडफडणं, याशिवाय आता काही उरलं नाही …
This entry was posted
on Wednesday, April 29, 2009
at 7:27 PM
and is filed under
Marathi Poetry
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.
Post a Comment